Friday 7 April 2017

साल्हेर ला कसं जायचं ? काय बघायचं ?

सह्याद्री - तमाम मराठी रयतेचा अभिमानाचा आणि गौरवाचा विषय. ह्याच दुर्गम सह्य रांगांमध्ये अनेक राजवटींनी किल्ल्यांची निर्मिती केली. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य उभारणीत ह्याच गडकोटांनी अवघ्या महाराष्ट्राचं नशीबच पलटवलं आणि एका सोनेरी युगाचा आरंभ झाला.
आज अनेक तरुण दुर्ग भटकंती मध्ये रस घेताना दिसतायत. बरेचवेळा अपुऱ्या माहितीविना बऱ्याच जणांची फजिती सुद्धा झालेली बघायला मिळते. माझ्या आजवरच्या दुर्ग भ्रमंती मध्ये बरेच अनुभव गाठीशी आले. चुकांमधून शिकत शिकत सह्याद्रीला मी गुरु मानलं आणि मला भरभरून ज्ञान मिळालं. अजूनही मिळतंय. पुढेही मिळत राहील. सह्याद्री नेहमी कृपा दृष्टी ठेऊन असतो आपल्यावर. तर असे एक एक गडकोट फीरतांना मी येऊन पोचलो सह्याद्रीतील सर्वोच किल्ले माथा - दुर्ग साल्हेर.  साल्हेर वारी तशी सोपी नाही आणि ह्यासाठीच इथपर्यंत कसं पोहचायचं ते आपण बघूया.

           सर्वप्रथम नाशिक शहर गाठणं महत्वाचं. नाशिक हे सर्व मार्गांनी महाराष्ट्राशी जोडलं गेलंय. त्यामुळे इथे आपण सहजरित्या पोहचू शकतो. नाशिकच्या जुन्या एस टी स्टॅन्ड वरून सटाणा ह्या तालुका ठिकाणी जाण्यासाठी गाड्या चालू असतात. साल्हेर किल्ला हा तसा लांब आणि दुर्गम भागात असल्यामुळे इथपर्यंत पोहचायला आपल्याला थोडे कष्ट उचलावे लागतात आणि वेळ सुद्धा खर्ची करावा लागतो. पण हे सगळं तुम्ही केव्हाच विसरता जेव्हा साल्हेर तुम्हाला मायेने कवेत घेतो. सटाणा वरून एस टी ची रहदारी कमी होते आणि त्यांच्या वेळा पाळणं म्हणजे आपला प्लॅन लांबू शकतो. ह्यासाठी सटाणा स्थानकाबाहेर प्रायवेट जीप उभ्या असतात. sharing पद्धतीने आपण ताहराबाद गाठायचं. हा संपूर्ण पट्टा महाराष्ट्र -गुजरात सीमारेषा नजीक असल्यामुळे येथून  गुजरातला ये जा करणाऱ्या लोकांची संख्या बरीच आहे.

          नाशिक - ताहाराबाद हे अंतर आपले २ तास नक्कीच खर्ची घालतो. ह्या जीप अतिशय टिपिकल जीप असून, खचाखच माणसं भरल्याशिवाय निघत नाहीत. त्यामुळे आपल्या बॅग्स ची व्यवस्थित काळजी घेणं उत्तम. ट्रेकर्सना ह्याची चांगलीच सवय असते पण नवखा माणूस थोडा बिचकू शकतो. ताहराबादपासून साल्हेरवाडी मार्गे गुजरात जाणाऱ्या बऱ्याच जीप उभ्या असतात. ती जीप पकडायची आणि गाडीवाल्याला सांगायचं वाघांमबे गावात उतरवा. ताहाराबाद -वाघांमबे साधारण पाऊण तास आहे. असे अनेक चढ उतार करत आपण एकदाचे साल्हेर पायथ्याला पोहोचतो -वाघांमबे . नाशिक -वाघांमबे तुमचे तीन साडे तीन तास नक्कीच घेतो. पण जितका मार्ग दुर्गम तितके फळ जास्त हा ट्रेकिंगचा नियमच असून तो आपण पळत वाघमबे मध्ये पाय उतार व्हायचं.


 साल्हेर चा प्रचंड आकार , इथे पोहचण्यास लागणारा वेळ हे सर्व पाहता गडावर एक तरी मुक्काम करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी घरातून निघताना जेवणाची सर्व व्यवस्था लावणं खूप महत्वाचं. कारण गावातून वाटाड्या मिळेल पण जेवणाची व्यवस्था गडावर कोणी करून देईल ह्याची मला थोडी शंका आहे. त्यामुळे आपली व्यवस्था आपण करणं केव्हाही उत्तम. ५-६ तासांचा प्रवास करून आपण दामलेलो असतो. त्यामुळे थोडी विश्रांती घेणं फार गरजेचं ठरतं. ह्यापुढील चढाई तब्बल तीन तासांची असल्यामुळे आपण "छत्रपती शिवाजी महाराज कि जय " म्हणायचं आणि मोर्चा वळवायचा थेट गडाच्या दिशेने. गावामागच्या शेतातून एक पायवाट एका ओढ्याकडे जाते. ओढा पार करून ही पायवाट एका उंचवट्यावर घेऊन जाते. हे टेकाड पार केलं कि एक मळलेली पायवाट आपल्याला स्पष्ट दिसते. ही वाट शेवटपर्यंत सोडायची नाही. इथून आपण सह्याद्रीचं रौद्र रुप डोळा भरून बघायचं. आपल्या उजव्या बाजूस बुलंद -बलाढ्य आणि अजस्त्र असा दुर्ग साल्हेर. तर डावीकडे साल्हेरचा भाऊ दुर्ग सालोटा आपले लक्ष वेधून घेतो. आपण ज्या वाटेने जातोय ती वाट एका खिंडीत येऊन थांबते. इंग्रजी 'व्ही ' आकाराची हि खिंड. येथून दोन वाटा फुटतात. डावीकडे सालोटा तर खिंडीतून सरळ साल्हेर. मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं कि अनेक जण साल्हेर करताना त्याच्या शेजारीच असलेला आणि अतिशय सुंदर अश्या सालोटा ला भेट देत नाहीत. सालोट्याच्या वाट्याला अशी उपेक्षा पाहवत नाही. वास्तविक सालोट्याची चढाई चांगलीच दम काढणारी असून त्याच्या ७५ कातळ कोरीव उंच पायऱ्या चढताना अनुभवलेला थरार आपण कधीच विसरू शकत नाही. सालोट्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा दरवाजा व त्याच्यावर तयार केलेली देवडी  (देवडी म्हणजे पूर्वी पहारेकरी सैनिक जिथे थांबत असत ती जागा ).  साधारणपणे देवडी ही दरवाज्याच्या बाजूला असते. पण सालोट्याचा दरवाजा अश्या अवघड ठिकाणी बांधला असून , उजवीकडे ३०००ft दरी आणि डावीकडे उभा अरुंद कातळ. त्यामुळे ह्याच्या दुर्ग निर्मात्याने चांगलीच कलपना लढवत दरवाज्याच्या वरच देवडी बांधून आपल्या दुर्ग स्थापत्याची कमाल दाखवली आहे. सालोट्याच्या माथ्यावरून साल्हेरचे जे अफाट दर्शन होते त्याला काय म्हणावे. आपण ज्या खिंडीतून वर येतो ती जागा आणि साल्हेर ची पुढील पायवाट येथून अगदी स्पष्ट दिसते. साल्हेरचा उभा कातळ ज्याप्रकारे 'C ' आकारात खोदून तयार केलेली वाट आणि त्या खाचेत रुबाबदारपणे उभा असलेला दरवाजा जर बघायचा  असेल तर सालोटा वरूनच हे शक्य आहे. त्यामुळे आवर्जून वेळ काढून सालोटा बघावा असं मी सांगतो. 



                     ट्रेक चालू होताच आपले स्वागत करणारे सह्याद्रीचे दोन रांगडे भावंडं : साल्हेर-सालोटा



                                        खिंड ओलांडल्यावर दिसणारा भव्यदिव्य सालोटा 


सालोटा आल्या वाटेने उतरून पुन्हा खिंड गाठावी. खिंडीतून सरळ जाणारी पायवाट थोड्याच वेळात आपल्याला साल्हेर च्या प्रथम दरवाजासमोर आणते. हा दरवाजा पार करून थोड्याच अंतरावर दुसरा दरवाजा असून ह्याची जागा आणि रचना तोंडात बोटं घालून बघावी अशीच आहेत. मघाशी सांगितल्याप्रमाणे 'C ' आकारात कातळ खोदून वाट बनवलेली दिसते. येथे एक फारसी भाषेतील शिलालेख सुद्धा आढळतो. ह्या नंतर येतो तिसरा दरवाजा आणि आपला गड प्रवेश होतो. साल्हेरचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची दरवाज्यांची  मालिका. तब्बल सात दरवाजे आणि तेही सुस्थितीत बघून फार समाधान मिळतं. पैकी तीन हे वाघांमबे बाजूने तर उरलेले चार हे साल्हेरवाडी बाजूने आढळतात. गडप्रवेश होताच सुसाट वारा आपला थकवा पळवून नेतो. काही अंतर पार केलं की आपण 'गंगासागर ' ह्या सुंदर बांधीव तळ्याजवळ येतो. चारही बाजूने सुंदर बांधकाम आणि मधोमध एक खांब असलेलं हे तळं आपले मन आकर्षित करतं. ह्याच्या काठावर सुबक मंदिर असून त्यात रेणुकादेवी व गणेशाची मूर्ती आहे. 'गणपती बाप्पा मोरया 'म्हणायचं आणि पुढची वाटचाल चालू करायची. ह्या मंदिरामागच्या एका छोट्याश्या उंचवट्यावर दोन मुक्काम योग्य गुहा असून आपण आपले बस्थान इथेच ठोकायचे. २० माणसांची आरामात सोय होईल अशी जागा असून समोरच चुलीचे दगड सुद्धा रचलेले दिसतात. काम च झालं. पोटपाणी आणि जरा अराम झाला कि गडाच्या पश्चिम बाजूकडे मोर्चा वळवायचा. म्हणजेच गंगासागर तलावावरून सरळ पुढे. इथे एक यज्ञवेदी दिसते व एक खोदीव टाकं सुद्धा लागतं. पाणी पिण्यायोग्य आहे. चिंता नसावी. 


साल्हेरच्या अप्रतिम दरवाज्यांपैकी एक दरवाजा  -वाघमबे बाजूने 



पश्चिम बाजूचा साल्हेरवाडीत उतरणारा सुबक बांधणीचा दरवाजा 

पश्चिम टोकावर जाताना जो परिसर दिसतो तो फार रमणीय असून, उतरत्या सूर्याच्या केशरी रंगात त्याचं सौन्दर्य अजूनच खुलतं.  सूर्यास्ताचा मनमुराद आनंद लुटून आपण अस्ताला जाणाऱ्या केशरी गोळ्याला मनापासून अभिवादन करायचं आणि उद्या सकाळी परत अशीच ऊर्जा घेऊन नक्की ये म्हणत आपण परत आपल्या मुक्कामी गुहेकडे आल्या वाटेने यायचे. ह्या पश्चिम टोकाच्या खालून जी वाट जाते ती थेट आपल्याला साल्हेरवाडीत पोहोचवते. पायर्यांचा थरार अनुभवत हि वाट आपण सकाळी उतरताना वापरणार आहोत. रात्र झाली कि साल्हेरवर प्रचंड बदल होतात. अवाढव्य किल्ला आणि वाऱ्याचा बेलगामपणा आपली चांगलीच कसोटी बघतो. साल्हेर जितका रौद्र तितकाच मायाळू सुद्धा. इथे मुक्काम केलेली रात्र आपण कधीच विसरू शकत नाही. गडावर जनावरांचा वावर नसला तरी सरपटणारे जीव मात्र आसपास असू शकतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी. 

                इथून दिसणारा सूर्योदय हा अतिशय सुंदर आणि सह्याद्रीची अफाट ताकद दर्शवणारा असतो. त्यामुळे आपण पहाटेच उठून किल्य्याचं परशुरामाचं मंदिर गाठायचं. आपल्या गुहेच्या वरून जाणारी पायवाट आपल्याला २०-२५ मिनटात मंदिरावर पोहोचवते. पायवाट काही ठिकाणी निसरडी असून काळजी घ्यावी. हेच ते साल्हेरचं शिखर -परशुराम मंदिर. बेफाम वाहणारा वारा आणि वातावरणातली गूढता आपल्याला भगवान परशुरामाचं अस्तित्व ठासून दर्शवते. हि जागा फार खास असून येथून दिसणारी अखंड सह्याद्री पर्वत रांग डोळ्याचं पारणं फेडते.  त्रिकोणी आकाराचा टोकदार सालोटा, बेलाग धोडप , मुल्हेर ,न्हावीगड, मांगीतुंगी सगळंकाही एका टप्प्यात.  हा क्षण मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवावा असाच आहे. आता एव्हाना तांबडं फुटलेलं असतं. सूर्यनारायणाला मनोभावे नमस्कार करत निसर्गाने केलेली मुक्त उधळण डोळ्यात गच्च साठवून घ्यायची. आल्या मार्गे गुहा गाठून बॅग भरायला घ्यायची. 



सूर्योदयाच्या छाया प्रकाशात न्हाऊन निघालेला सालोटा -साल्हेर वरून 




परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवरून दिसणारा भव्य गंगासागर तलाव व आसपास चा परिसर 



सर्वोच किल्ल्यावरून दिसणारे सह्याद्रीचे अफाट रुप. समोर सालोटा आणि दूरवर मुल्हेर पर्यंतचा प्रदेश. 

 उतरताना साल्हेरवाडी मार्गी उतरणं सोयीचं. काल सूर्यास्त वेळी बघितलेली पश्चिम बाजूची वाट ती हीच. एक तर ह्या वाटेत सुद्धा दरवाज्याची सुंदर मालिका असून पायऱ्यांचा मार्ग बऱ्यापैकी साहसी आहे. दुसरं म्हणजे परतीची वाहनं आपल्याला साल्हेरवाडी गावातूनच लवकर मिळतात. वाघांमबे ला वाहने मिळण्यास फार वाट पाहावी लागते आणि वेळ खर्ची पडतो. 

महत्पूर्ण सूचना -
* साल्हेर लांब अंतरावर असून वेळेचे नियोजन पक्के करावे. 
*जेवणाचे साहित्य सोबत घेऊनच जावे 
*शक्यतो स्वतः चे वाहन असले तर उत्तम. गड बघण्यास जास्त वेळ देऊ शकतो. 
*मुक्काम करावा. 
*सालोटा शक्यतो टाळू नये. देखणा किल्ला आहे. 
*गडावर सरपण कमी असून, ट्रेक करताना हळू हळू लाकडं गोळा करत जावं. 
*वाटाड्याची तशी आवश्यकता नाही पण confidence नसेल तर अवश्य घ्यावा. 
*किल्ल्याची स्वछता आणि पावित्र्य राखणं हा आपला धर्म समजून वागावे आणि कोणी तसे करत नसल्यास त्याला अडवावे. 
*आपला गड -आपला अभिमान 

-जय महाराष्ट्र -

-ब्लॉग कसा वाटला हे कंमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा . भरपूर फिरा ,मौज करा पण निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता. 
पुढचा ब्लॉग -लवकरच 

-आपला 
Traveler AK
9664284368 / 9167979686 (Whatsapp)
Email- kastaniket@yahoo.co.in

YouTube Channel Link - https://www.youtube.com/channel/UCAnF28a_70u_Vry31fECZ7w

Monday 13 June 2016

M for Monsoon-Mountain-Memories

The scorching season of the summer has almost ended and we all are desperately waiting for the monsoon-everyone's favorite. This kicked me up to write something on rains and the memories associated with it.
In this blog I will be sharing my 'Monsoon Work' and also my love towards the gray clouds i.e. monsoon.

When it comes to speaking on Monsoon, I really get stuck up from where do I start? There are tons and tons of memories right from childhood where rain has played very crucial part in every stage of my life. I still remember school days when I used to come home all wet in the rain. Books getting wet and long scoldings from mom. But I cared a shit when it was between me and the rain. It was an affair which nobody can understand, and till date we are in relationship. I guess everyone has memories attached with this amazing season. As age accelerated, things also changed rapidly. Childhood rain was innocent but the grown up monsoon gets little selfish and many of us end up in the loneliness. The definition of the monsoon changes at every stage of life for each of us. Some find it sad, some find it romantic, some are in love with the green zones, some finds adventure in it, for some it is having a cup of coffee in the balcony, for some its time to get cozy with their love and so on. The list never ends and so are the showers.

Myself being a poet by heart, an artist by nature and a travel photographer by profession finds monsoon as a mix bag of all emotions residing in ourselves. I have seen all these stages during my three years of expeditions in the Sahyadris. For me monsoon is the only season which has capacity to pull out all your emotions,values and experiences just by standing under a huge gray clouds.

It was monsoon  which geared me up to hold camera in the midst of the sahyadris. I still remember my initial monsoon treks where I used to just stare at the rapid showers doing nothing but pouring every drop of it in my soul. This is where I started communicating with nature's one of the powerful element-WATER. As treks increased, my love for rains grew tremendously on each occasion. It became one of the most important part of my life and I started sharing everything with the rains. This may be because during my early days I was not a social person having selected group of friends and a kind of introvert personality. However things changed very rapidly during the course of time. Nature therapy is the best healing, as we know.

As far as photography is concerned I had no 'Teacher'. I am a self made photographer. But I must say that nature is undoubtedly my only teacher who taught me all aspects of life which resulted in my photography. It's teachings helped me flourish various dimensions of myself and also with my camera. Every time I take a picture of the monsoon, it pours out some hidden emotion which reflects in my work giving stunning result.

Here are some of my selected pictures which replicates my emotions through lens. Each photograph has some memory attached to it.


 I was standing on the edge of the waterfall and this view was at my backside. I turned casually and was stunned to see such a vast, thick, lush green forest of the Alibaag zone.




This was the shot I was clicking as mentioned under the first photo.





This a very famous location among trekkers - Fort Tailbaila. This is a magnificent wall with an interesting gap dividing it in two parts. I have written a separate blog on this describing its beauty. It has always been my favorite spot and I am so fortunate to capture this dramatize situation.




In the earlier picture we saw fort Tailbaila. And the above one show what we can see from the Tailbaila. It is such a gorgeous location and this rock attracted me to use it as a great subject for a 'Monsoon Landscape'.





Wandering randomly take us to a surprising location filled with tremendous beauty. Photographing here was bit tricky as climate was not favorable for Long Exposure Photography. However I had a strong determination to have this kind of picture at any cost. The rocky formation and water flow was just fantastic. Finally I got one picture worth a wait.





This shot was not on the plan, but seeing the elements I decided to give it a shot. Results were pretty much satisfying though.





This is one of the memorable waterfalls discovered with the help of my friend (in the photo). A day to remember. Thanks buddy.





The very famous- Takmak Tok on the fort Raigad. It was rainy evening of July and got some good stuff.





Muddy road cutting the green zone. Such trails make you feel lost in your own world. Birds chirping in their sweet voices, cool breeze touching your face smoothly as if nature is giving you a soft kiss.





The splendid view of the green velvet and those huge gray clouds planning to shower rapidly somewhere.





When the monsoon god decides to bombard a particular area. Look at those extra huge gray clouds filled with tons of water. And immediately after this click, it started raining like hell.





Walking down the waterfall route is always an mesmerizing experience. This was the starting point of the huge waterfall which was above that rock patch.





This is where my trail ended as described in the earlier picture.





The panoramic gathering of the rain clouds covering fort Tung as seen from fort Tikona. This entire area is simply awesome. Perfect for Landscape Photography.





I don't have a drone camera. So I end up climbing high summits and standing on the cliff in an attempt to capture 'Bird's eye view'. Totally a risky job but worth an effort.





Again an aerial view of the stunning sahyadris and lush green forest with beautiful river cutting the mighty rocks.





Once again it was time for some risky adventure to capture helicop view from the fort Sudhagad.





Trekking through waterfalls always fascinates me. It not only gives you stunning pictures but also immense joy of walking through water.





Sahyadri is a home to many species of flora and fauna. This one was very unique and it's color attracted me.





Sunsets in the monsoon are not the typical one. It has slight yellow cast and little warm hues spreading across the green velvet. This looks soothing and has an aura of it own.




Wandering never stops...





Forests under fort Mahuli is still one of the most thick forests of the western ghats. During monsoon its rich density of flora,fauna,mammals and waterfalls is on a different high level. You are constantly on a radar of many predators hiding behind lush vegetation. Mahuli's forest is my all time favorite. It has given me so much, yet I never dare to go here alone. This thrill excites me for more and more exploration and photography.





Mahuli Forest is something one must visit during monsoons. You will be awe struck by its beauty.





The breathtaking view of the 'Vanar Lingi' pinnacle taken from fort Sagargad, Alibag. This is a typical monsoon location with serene landscape and fresh forest.





A side angle view of the same pinnacle. Far away is the sea shore of revdanda.





The simply jaw dropping view of the famous 'Thosegar Waterfall' in Satara. If you are planning to visit one of the most stunning and huge waterfall this monsoon, then do visit here.





I just love standing on the edge of the waterfalls. This makes you more crazy towards nature.





This is my relaxing bed during monsoon. Taking a rest in the water is the best massage empowering all your nerves and soul too.





Your monsoon expeditions are incomplete without visiting Naneghat. This is perhaps the most favorite spot for many trekkers and photographers. Here winds are so strong that the waterfalls are pushed upwards. They can only reach ground after the wind stops. Crazy, isn't it?





Walking on the edges of fort Korigad during monsoon is superb feeling.





The mother nature is the best artist. How delicate and beautiful tiny flowers blooming over the cliffs of the sahyadris.





The green grass in the background appeared as an abstract form and a pair of bright yellow flowers added more aesthetics.





Water constantly motivates me. It has taught me to move forward regardless of any obstacles you face. The water flow in the above picture is just about to fall from the edge with no fear.





Walking beside small water bodies is a fun in itself. You got to a variety of things dependent on these sources. If you are a macro lover then such spots are heaven for sure.





Generally my landscape do not include human objects unless it is required strongly. However this rail lines attracted me enough to keep it as main element of the picture. Matheran is just amazing in monsoon.





Sahyadri is incomplete without its people. The tiny village settlements are a great subject to shoot. Villagers have always been kind enough with me and have helped me a lot. They take care of my Bike and Car which I park in their fences, they offer me food,water and any kind of help required. They usually ask me 'why do you roam in the forests and hills?'
I have no answer. Hahahahaha.





Rural Water Kingdom.
This is perhaps the most amazing water sport. Immediately after this shot, I joined these guys.


So its time to take your leave. I hope you guys enjoyed my monsoon safaris. I will be uploading more pictures and rain stories from the upcoming season. Till then have fun, roam a lot, love mother nature and the Sahyadris. Plz do comment and let me know your views.
Regards
-Aniket Kasture


Note- All pictures are my copyrights. Any type of usage will require permission of the Author Photographer 

Monday 14 September 2015

सह्याद्रीतल्या गप्पा आणि आठवणी

'सह्याद्रीतल्या गप्पा आणि आठवणी'






गेले अनेक महिने लिहायला काही सुचत नव्हतं, आणि जेव्हा सुचायचं तेव्हा वेळ नसायचा. ह्या अश्या गुंतागुंतीत लिखाण दूर जातंय ही जाणीव फार बोचत होती. सह्याद्रीमधे उनाड्पणे फिरताना कित्येकदा डायरी सुद्धा सोबत नेली. पण मन हे मोठं चंचल आणि उत्सुकतेनं भरलेलं असल्यामुळे सगळा वेळ फिरण्यात, फोटोग्राफी करण्यात आणि माझ्या सह्याद्रीशी गप्पा मारण्यातच जात असे. मी आणि हा बलाढ्य सह्याद्री दोघेही ठार वेडे आहोत. मी तर महावेडाच. आमचं काय चाललेलं असतं कुणास ठाऊक, पण एक हे एक विचित्र असं प्रेम प्रकरण आहे. आणि प्रेमात सगळं माफ असतं, नाही का ?




इथल्या mm च्या खड्यापासून ते १००० फुटी कातळापर्यंत प्रत्येक वस्तूवर, वास्तूंवर आणि जीवांवर फार जीव आहे माझा. इथलं प्रत्येक पान माझ्याशी बोलतं, प्रत्येक फ़ूल माझ्याशी हस्तं, इथला प्रत्येक कातळ मला उभारी आणि करारीपणा देतं, क्वचित प्रसंगी हे कातळ मला रागावतात सुद्धा. कुठेही डगमगलो कि शिव्या हासडतात आणि त्याला भिडण्यास प्रोत्साहन देतात. इथला बेफाम वारा म्हणजे फिरता दवाखानाच म्हणा, सगळा थकवा, त्रास, घाम एका क्षणात गायब करण्याचं कौशल्य ह्या वाऱ्यात आहे. इथलं आकाश मला भरारी घेण्याची अनेक स्वप्न बघायला भाग पाडतं, पंखांना बळ द्यायची वेळ झालीये असं बजावत असतं. आकाशाकडे टक लाऊन तासंतास बघत बसण्यात जे सुख आहे त्याला काय कशात मोजणार आपण. ढगांचे बदलणारे आकार, पृथ्वी कशी गोल फिरते ह्याचा होणारा भास, हे सगळं फारच चमत्कारिक आहे.





हे सर्व चालू असताना अचानक एक शिकारी पक्षी आकाशात घिरट्या घालताना दिसतो आणि एकाकी तो हवेतल्या हवेत स्थिरावतो. बेफाम वाऱ्याला केवळ दोन पंखांवर झेलत तो स्थिर आणि गंभीरपणे आपली ताकद अजमावत असतो. Wildlife च्या भाषेत सांगायचं झालं तर तो 'Hovering' करताना दिसतो आणि पुन्हा हे चंचल मन त्या पक्ष्याच्या विचारांनी घेरलं जातं. इतकी शक्ती ह्या पंखांमध्ये येतेच कशी ? ह्या प्रकारात लहान पक्षीसुधा अतिशय सफाईदारपणे ही कलाकुसर दाखवत असतात. काही क्षणांच्या ह्या खेळात निसर्ग कितीकाही शिकवून जातो.


















अशी प्रेरणा घेऊन मी पुन्हा भटकायला चालू करतो तोच पावले पुन्हा थबकतात. आपल्या वजनाच्या कितीतरी पट मोठं वजन एक जंगली मुंगी आपल्या खांद्यावर वाहून नेत असते. कैक वेळेला मी तिला प्रवाहाच्या उलट्या दिशेने प्रवास करताना पाहिलं आहे. केवढीशी ती मुंगी, काय तिची अफाट ताकद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती. तिला मनोमन सलाम ठोकत माझी पावलं पुढे सरकत असतात. नाना प्रकारच्या पानाफुलांनी आणि अक्राळ विक्राळ जुन्या वृक्षांनी भरलेला माझा सह्याद्री पाहताना एक विलक्षण समाधान असतं. ह्या घनदाट अरण्यात लाखो जीवाणू आपली दिनचर्या नियमितपणे पार पाडत असतात. आपण तिथे जातो तेव्हा नक्कीच त्यांना त्रास होत असणार, कारण हे शेवटी हे त्याचं घर आहे,आपलं नाही. पण आपल्यामुळे त्यांना कसलाही त्रास होऊ देण्याचा माझा आटोकाट प्रयत्न असतो. आपण सर्वांनीच तसा करायला हवा.





















सह्याद्रीमधलं माझं सगळ्यात आवडतं element म्हणजे 'पाणी'. मग ती झर्याची छोटी धार असो नाहीतर अखंड मोठा फेसाळता धबधबा असो, किवा एखादं विशाल तळ असो नाहीतर खोदीव पाण्याचं टाकं असो. पाणी हा एक अनोखा चमत्कार आहे सह्याद्रीचा. इथेसुद्धा आमचा गप्पांचा सिलसिला चालूच असतो.
















अश्या ह्या खडकातून आणि पाण्यातून वाट काढत काढत मधेच कुठेतरी गडाचा कातळ ,किवा अस्पष्ट तटबंदी दिसायला लागते आणि मग पावलं जो वेग पकडतात आणि केव्हा एकदा माझ्या दरवाज्याला आणि तट बुरुजांना मिठी मारतोय असं होऊन बसतं. चालताना मनात फक्त शिवराय, शंभूराजे आणि स्वराज्याचे लाखो वार आपल्या देहावर हसत हसत झेलणारे माझे मावळे आठवत असतात. अश्यावेळी खूप गहिवरून येतं आणि अभिमानाने भरून सुद्धा येतं. बेफाम तलवारबाजी करणारा बाजीप्रभू आठवतो, दिलेरखानाचा भाला छातीत रुतलेला असताना महाराजांच्या नावाचा जप करणारा मुरारबाजी आठवतो, त्या हरामजाद औरंग्याचे ४० दिवस अतोनात छळ सोसलेला संभाजीराजा आठवतो आणि आपल्या राजाला मरेपर्यंत साथ देणारा कवी कलश सुद्धा आठवतो. माझ्या किल्ल्यांवर अनेक मर्दांनी रक्ताचा सडा टाकला म्हणून आज मी हिंदू आहे ह्याचा मला फार अभिमान वाटतो. पण एका गोष्टीचं नेहमी प्रचंड वाईट वाटतं. ते म्हणजे- आपण त्या काळात जन्माला का नाही आलो ह्याचं. घर दार सोडून शिवरायांच्या पायाशी लोटांगण घातलं असतं आणि पडेल ते काम केलं असतं. दुर्दैवानं आज असे कोणतेच पावलं नाह्येत ज्यापुढे माथा टेकवावा





















अश्या मिश्र भावना आणि कल्लोळ मनात दाटलेला असताना एकाकी गडावर प्रवेश होतो आणि नकळतपणे शिवगर्जना ओठी येते  - प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलवतौस..................................................

















गडावर पोचताच त्या दगडी चीरांवरून हाथ फिरवत चालण्याचा माझा नेहमीचा शिरस्ता आहे. ह्यामागे माझी अशी श्रद्धा आहे कि जेव्हा आपण ह्या कातळावरून प्रेमाने हाथ फिरवतो तेव्हा दोघांमधे एक नातं निर्माण होतं, जवळीक आणि आपुलकी वाटू लागते आणि आपोआपच कातळाशी ऋणानुबंध जुळतात. अनेक वर्ष उपेक्षेत असलेले हे इतिहासाचे मूक साक्षीदार आपल्याशी बोलू लागतात आणि मग हजारो वर्षांचा कालखंड आपल्या नजरेसमोरून वाहू लागतो. इथेच सह्याद्रीची खरी गंमत आहे. अख्या जगात लाखो डोंगर आहेत, पण फक्त सह्याद्री ला इतिहास सुद्धा आहे. माझं काय थोर भाग्य कि मला सह्याद्री ने इतक्या कमी वर्षात आपलंसं करून टाकलंय. आणि नुसताच आपलंसं नाही केलं तर ह्या वेड्याने झिंगच चढवली आहे पार.


















विस्तीर्ण सह्याद्रीचा तेवढाच विस्तीर्ण इतिहास आणि जागो जागी त्याची साक्ष देत उभे असलेले किल्ल्यांचे अवशेष पाहताना मन उत्कंठेच्या शिखरावर असतं. कित्येकदा माझ्या आसपास मावळे फिरत असल्याचा भास होतो, महादरवाजातून कोणत्याहीक्षणी महाराज येतील असं सारखा वाटतं. मी कुठेतरी निवांत पहुडलो असताना अचानक शंभूराजे बघतील आणि आपल्याला दम भरतील अशी भीतीसुद्धा वाटते. गडावर असताना माझी अशी काही भंबेरी उडालेली असते कि विचारायची सोय नाही. मी शरीराने २१व्या शतकात आणि मानाने १६व्या शतकात.

















ह्या माझ्या सुंदर, देखण्या, रुबाबदार, बुलंद,राकट ,बलदंड सह्याद्रीची वेगवेगळी रूपं आपल्या कॅमेऱ्यात टिपता यावी म्हणून माझे अतोनात प्रयत्न चालू असतात. ह्यासाठी वाट्टेल  ते करताना माझ्या काही जवळच्या मित्रांनी मला पाहिलं आहेच. मी त्यांना गंमतीने म्हणतो कि 'दोनदा स्वर्गाची घंटा वाजवून आलोय, आता तिसर्यांदा थेट प्रवेश'. तर हे नालायक म्हणतात कसे- 'तुला स्वर्गात कोण घेणार, नर्क तरी available होतोय का बघ आधी'.
कितीही कुचके असले तरी आपले खास आहेत. त्यांच्याशिवाय सह्याद्रीची फेरी अर्धवटच वाटते.
'TWO IS THE COMPANY' ह्या नियमाप्रमाणे कित्येकदा मी आणि माझा कोणताही एकच मित्र असे भटकलोय. धोडपच्या डोंगरावर, बोचऱ्या थंडीत अख्या गडावर आम्ही दोघेच. ती शांतता आणि तुफान थंडगार वारा. गुहेमधे उंदरांनी मांडलेला उच्छाद, त्यामुळे एकही क्षण झोपायला मिळनं, मध्य रात्री बनवलेला चहा आणि सूर्याची पहिली किरणं गुहेत येईपर्यंत केलेलं अखंड जागरण. आम्हाला हे मधेच आठवतं आणि पोट धरून हसतो आम्ही. ट्रेकर असेच असतात, त्रास झालेल्या गोष्टी त्यांना आठवल्यावर ते अजून आनंद घेतात. हि जातच अशी आहे त्याला काय करणार.













अशीच आठवण साल्हेर गडावरची- डिग्री तापमान असताना मी आणि माझा मित्र एकाकी साल्हेरला निघतोय काय, तिथेही आम्ही दोघेच, सूर्यास्त पाहायला जातो आणि त्या प्रचंड बोचऱ्या थंडीत आमच्या अंगावर साधं स्वेटर नाही कि मोजे नाही, तुफान वारा, हातात कॅमेरा-ट्रायपॉड असा लवाजमा आणि आम्ही चाललोय पश्चिमेला. ना तहान ना भूक. पण ह्यासगळ्याचं काहीच वाटत नाही जेव्हा सह्याद्रीवर सूर्यास्ताची केशरी छटा उमटू लागते आणि सारा आसमंत एक विलक्षण कलाकृती तयार होताना दंग झालेला असतो. आणि आम्ही ? आम्ही एकदम स्तब्ध आणि वेगळ्याच मानसिक अवस्थेमधे. साल्हेरची पौर्णिमेची रात्र तर जन्मात विसरता येणार नाही अशीच.
















नुसत्या आठवणींची यादी करायला घेतली तर अख्खं पुस्तक बनेल. माहुलीच्या गर्द अरण्यातून केलेली रात्रीची चढाई, तो थरार आणि वरून सूर्योदय न्याहाळणं. 'नानाच्या अंगठ्यावर' जात असताना 'बसून' केलेली चढाई, कारण वाऱ्याचा लगाम इतका सैल झाला होता कि आम्ही उभे राहिलो कि तो आम्हाला खाली पडायचा. बसून जाण्याखेरीज पर्यायच नव्हता. गोरखगडच्या माथ्यावरून खाली पडलेली माझी कॅमेर्याची sack, आणि ती पकडण्याच्या नादात माझा गेलेला तोल, जो माझ्या मित्राने सावरला. मग हिरा सरांच्या मदतीने जंगलात शोध मोहीम आणि अखेर sack सापडते. असे थरारक प्रसंग आता फार मजेशीर वाटतात खरे पण त्यावेळेस मात्र भीतीने पार दाणादाण उडालेली असते. मोरोशीचा भैरवगड उतरताना सापडत नसलेली वाट, मुसळधार पाऊस, जिकडे तिकडे लागणारा 'dead end', अंधार वाढत चाललेला, त्या जंगलात बिबट्यांचा बऱ्यापैकी  वावर असल्याने सतत धाकधूक वाढत चाललेली, काय करावे दोघांनाही सुचेना. शेवटी धबधबा हा आपला गुरु असं म्हणून ती वाट आम्ही धरतो आणि धरपडत का होईना पायथ्याला पोचतो. पण इथेसुद्धा सह्याद्री माझी निराशा करत नाही. खाली उतरताच अचानक वातावरण बदलतं आणि एक सुंदर सुर्यास्ताचा फोटो मला बक्षीस म्हणून सह्याद्री देतो. ह्याला म्हणतात प्रेम. माझी नस बरोबर माहितेय त्याला.






गडावरची रात्र सुद्धा एक अजबच दुनिया आहे. इथे कोण तुम्हाला आशीर्वाद देईल आणि कोण शाप ह्याचा अंदाज बांधणं महाकठीण काम. अखंड सावध असणे हाच काय तो उपाय. गडद निळं आकाश, शांतपणे सगळ्यांवर नजर ठेऊन असलेला चंद्रमा, त्याच्या शीतल प्रकाशात स्वतःला शांत करून घेणारी पृथ्वी, एकाकी चिडीचूप झोपलेले पक्षी, झाडेही जरा गुंगीतच असल्याचा भास, वाऱ्याला मात्र वेळ काळ काही नसल्यासारखा रात्रीसुद्धा भरधाव वाहतोय, मधेच लुकलुकणारी चांदणी. सगळंच अगदी छान अल्ल्हादायक असताना मन पुन्हा कोलांट्या उड्या मारायला चालू करतं. वास्तवातून स्वप्न नगरीत प्रवेश घेऊ पाहतं. आपल्याला झेपणाऱ्या आणि परवडणाऱ्या गोष्टी करण्यात ह्या मनाला काय धन्यता वाटते कोणास ठाऊक. विचारांच्या घोड्याला लगाम द्यायला गेलो कि तो अजूनच सुसाट धावतो. सह्याद्रीतली रात्र म्हणजे गणिताचा तास असतो माझ्यासाठी.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर करायच्या असलेल्या 'वजा बाकी' करण्याचा तास.
 भूतकाळातल्या गोष्टी 'वजा' करून भविष्यात 'बाकी' काय काय ठेवायचं ह्याचा तास.
अनेक प्रसंगात आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्ती 'वजा ' करण्याचा तास.
पुढील प्रत्येक प्रसंगात आपल्यासोबत नेहमी असतील अश्या काही व्यक्ती 'बाकी' कश्या ठेवता येतील ह्याची आखणी करण्याचा तास.
सह्याद्रीची रात्र आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देते,अगदी अचूक. तिसऱ्या डोळ्याने विश्व बघावं तसं हि रात्र आपल्याला खरं विश्व दाखवते आणि अनेक गोष्टींची जाणीव आणि उलगडा करून देते.





 अश्याच एका रात्री  'ती ' नावाची concept डोक्यात येते आणि बघता बघता त्याची कविता बनते- अतिशय spontaneously सुचलेली हि कविता, प्रत्येकाला आपली ' ती ' नक्कीच याद आणून देईल.-


'ती '
इथला झरा तुझ्याच  आनंदात वाहतो,
इथली पाखरं तुझ्याच चंचल स्वभावाची आठवण करून देतात,
इथल्या दवबिंदूंवर तुझाचाच ओलावा आहे,
इथली फुलं तुझेच गीत गटात ,
इथल्या सुळक्यांवर तुझेच शौर्य लकाकते,
इथले मळभ तुझ्याचरुपी पावसाची चाहूल देतात,
इथल्या किरणांवर तुझीच झळाळी असते,
इथले नभ तुझाच स्वच्छंद विहार दर्शवते,
इथल्या वेलींवर तुझाच हळुवारपणा आहे,
इथले कातळ तुझीच शक्ती सांगतात,
इथला दगड तुझाच खोडकरपणा याद आणतो,
इथल्या मातीवर तुझ्याच पाऊलखुणा आहेत,
इथल्या विजेत तुझाच करारीपणा आहे,
इथला उन्हात तुझ्याच आठवणींचा दाह आहे,
इथल्या प्रत्येक वृक्षात तुझीच सावली आहे,
इथल्या वाऱ्यावर तुझीच झुळूक आहे,
इथल्या वादळात तुझेच तांडव आह,
इथल्या चंद्रात तुझीच शीतलता आहे,
इथल्या चांदण्यात आपल्यातील अंतर आहे,
इथल्या काळोखात तुला गमावण्याची भीती आहे,
इथल्या भयाण शांततेत तुझीच हुरहूर आहे,
इथल्या सुर्योदायात तुझीच अशा आहे,
इथल्या सुर्यास्तात मात्र तुझीच निराशा आहे,
इथला तू असण्या, नसण्याचा खेळ तसाच आहे,
तोही तसाच आहे, आणि ती ???
तीही तशीच - निस्तब्ध, एकाकी आणि अलिप्त.
- अनिकेत



ब्लॉग कसा वाटला ते ह्या पोस्टला comment करून नक्की कळवा , किवा mail सुद्धा करू शकता -
kastaniket@yahoo.co.in 

धन्यवाद!!!

माझे फोटो काढलेल्या सर्व मित्रांचे मनापसून कौतुक करतो, आभार नाही मानणार कारण मैत्रीत आभार प्रदर्शन नसतं. 
त्यांच्यामुळेच अनेक प्रसंग कायमस्वरूपी  'saved ' राहतील. 


All Photo copyrights are reserved with the Photographer, any use of the same will require prior permission of the Photographer- Aniket Kasture-9664284368